जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) अहमदनगरची स्थापना १९९७ मध्ये शासकीय डी.एड. कॉलेज संगमनेर (जि. अहमदनगर) चे DIET मध्ये रूपांतर करून करण्यात आली. सुरुवातीस ही संस्था जुन्या इमारतीत कार्यरत होती, परंतु २०११ साली नवीन ५.२७ एकर क्षेत्रफळाच्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित झाली. ही संस्था संगमनेर शहरात असून, अहमदनगरपासून सुमारे १०० किमी अंतरावर नाशिक–पुणे महामार्गावर वसलेली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NPE 1986) नुसार, जिल्हा स्तरावर शैक्षणिक गुणवत्तेचे केंद्र म्हणून DIET संस्था कार्यरत राहावी हा उद्देश आहे. जिल्हास्तरावर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संसाधन केंद्र म्हणून DIET उभारी घेऊ शकते.
प्राथमिक व शालेय शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या विविध योजना आणि कार्यक्रमांच्या यशासाठी स्थानिक स्तरावर शैक्षणिक संसाधन सहाय्य पुरवणे. RTE कायदा, RMSA, NCF च्या पार्श्वभूमीवर DIET ची जबाबदारी केवळ शिक्षक प्रशिक्षणापुरती मर्यादित नसून शाळांमधील गुणवत्तेचे व्यवस्थापन, शिक्षकांचा व्यावसायिक विकास, जिल्ह्यातील शैक्षणिक समन्वय, मूल्यमापन, संशोधन, ICT वापर आणि अभिनव प्रयोग यामध्ये आहे.
मा.राज्यपाल
मा. मुख्यमंत्री
मा. उपमुख्यमंत्री
मा. उपमुख्यमंत्री
मा.शिक्षणमंत्री
मा. शिक्षण राज्यमंत्री
अप्पर मुख्य सचिव
आयुक्त, शिक्षण
संचालक, SCERT, पुणे
प्राचार्य
(२७ जून २०१८ च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णयानुसार )
अ.क्र. |
विभाग |
|---|---|
| १ |
शिक्षक शिक्षण विभाग मराठी, इंग्रजी, गणित, उर्दू, विज्ञान, सामाजिक शास्त्र |
| २ | व्यवसाय विषय शिक्षण, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण (सीपीडी), व्यवसाय मार्गदर्शन व समुदेशन विभाग |
| ३ | संशोधन, क्षेत्रीय आंतरक्रिया, समता विभाग |
| ४ | अभ्यासक्रम विकसन व मूल्यमापन, शैक्षणिक व माहिती तंत्रज्ञान , संदर्भ साहित्य विकसन विभाग |
शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने नियोजनबद्ध व योग्य पद्धतीने कार्य करीत राहणे आवश्यक आहे. या शाळांमधून घडणारी मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. शाळेतून घडणारे उद्याचे नागरिक हे शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम राहतील या दृष्टीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर ही संस्था शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अत्यंत तळमळीचे कार्य करीत आहे. शासनाच्या शिक्षण विषयक सर्व योजना, सर्व संकल्प, शिक्षण विभागाशी संबंधित कायदे, नियम, सूचना, परिपत्रके व विविध स्तरावरील नियोजन यानुसार शैक्षणिक प्रगतीसाठी सर्व पर्यवेक्षीत यंत्रणा सर्व शिक्षक बांधवाना सोबत घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षक संघटना, पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी मनःपूर्वक व तेवढ्याच आत्मीयतेने आवश्यक ते सर्व सहकार्य केले आहे. जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील प्रत्येक मूल या शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे. त्याला किमान पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंत दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेचे सक्षमीकरण करून प्रत्येक मुलाला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.